मंगळवेढा (सोलापूर) : धनंजय शंकर पाटील लिखित आणि सोलापूरच्या ‘थिंक टँक पब्लिकेशन्स’तर्फे प्रकाशित ‘दैव’ या कथासंग्रहाचे, तसेच ‘पसायदान’ (जून २०१७) या ई-मासिकाचे प्रकाशन सोलापूर येथील प्रसिद्ध लेखिका आशा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेने मंगळवेढा येथील दामाजीनगर शाखेच्या वतीने, ज्ञानदीप विद्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या वेळी विश्वनाथ ढेपे, कथालेखक राजेंद्र भोसले, प्रा. दत्ता सरगर, आशा पाटील, धनंजय शंकर पाटील यांनी ‘दैव’ कथासंग्रहाविषयीचे आपले विचार व्यक्त केले. समारंभाचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अश्फाक काझी यांनी प्रास्ताविक, तर बालाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन कवी गोरक्ष जाधव यांनी केले.
या वेळी मंचावर अॅड. तोडकर, रत्नप्रभा पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शंकर पाटील, अॅड. नंदकुमार पवार, अॅड. रमेश जोशी, अंकुश गाजरे, कवी विजयकुमार देशपांडे, कवी गणेश गायकवाड, विठोबा सरगर, सुनील बिराजदार, प्रा. विश्वनाथ ढेपे, प्रा. दत्ता सरगर, कवी गोरक्ष जाधव, संगीता मासाळ यांच्यासह बहुसंख्य साहित्यरसिक उपस्थित होते.